Aaditya Thackeray On Maharashtra Sarkar : हे सरकार चालवताय की कॉमेडी शो? आदित्य ठाकरे यांचा ट्विट करत सरकारला सवाल
मुंबई | राज्य सरकारने इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषेचे मौखिक शिक्षण सक्तीचे करण्याचा निर्णय घेतल्यानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. या निर्णयावर विरोधकांनी जोरदार टीकेची झोड उठवली असून, विशेषतः शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी थेट शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्यावर निशाणा साधला आहे.
“शाळेत जाऊन आधी तुम्हीच धडे घ्या, मग इतरांना शिकवा!” अशा शब्दांत आदित्य ठाकरेंनी सरकारच्या निर्णयाची खिल्ली उडवली आहे. त्यांनी शिक्षण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत म्हटलं, “पहिलीतील मुलांवर आधीच तीन भाषांची सक्ती आहे. त्यात आता मौखिक हिंदी शिकवा म्हणताय, पण पुस्तकच नाही! हे सरकार चालवताय की कॉमेडी शो?”
गुरुवारी शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, इयत्ता पहिली ते तिसरीपर्यंत हिंदीचे ‘मौखिक शिक्षण’ दिले जाईल आणि ही बाब अभ्यासक्रमात नाही, तर भाषेची ओळख म्हणून शिकवली जाईल. मात्र, या स्पष्टीकरणानंतरही वाद थांबलेला नाही.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…