मुंबईठाणे
Trending

Sabha Raut : “अजितदादांचा पक्ष आता शाहांच्या चरणी अर्पण!” संजय राऊतांचा भाजपवर हल्ला; विलीनीकरणाच्या चर्चेवरून खळबळजनक दावा

Sanjay Raut On BJP : हा पक्ष आता ‘मराठी’ राहिला नसून मोदी-शाहांच्या तालावर नाचणारा झाला आहे; राऊतांच्या विधानाने राजकारण तापले

मुंबई :- अजितदादा पवार Ajit Pawar यांच्या निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात निर्माण झालेली पोकळी आणि त्यानंतर सुरू झालेल्या राजकीय समीकरणांवर शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी संतापजनक शब्दांत प्रहार केला आहे. “अजितदादा असेपर्यंत राष्ट्रवादीच्या त्या गटात किमान मराठमोळी अस्मिता तरी जिवंत होती, पण आता हा पक्ष स्वाभिमान विकून पूर्णपणे अमित शाहांच्या Amit Shah चरणी अर्पण झाला आहे,” अशा शब्दांत राऊतांनी महायुतीवर घणाघाती हल्ला चढवला. या विधानाने राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा ठिणगी पडली आहे.

संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधताना अत्यंत गंभीर दावे केले. त्यांच्या मते, मूळ राष्ट्रवादी पक्ष हा शरद पवारांच्या सावलीत वाढलेला आणि मराठी माणसाच्या हिताचा विचार करणारा पक्ष होता. मात्र, भाजपने सत्तेच्या आणि यंत्रणांच्या जोरावर या पक्षाचे दोन तुकडे केले. आता अजितदादांच्या पश्चात हा पक्ष केवळ ‘दिल्लीच्या इशाऱ्यावर’ नाचणारा बाहुला झाला असून, तो आता मराठी माणसाचा राहिला नसून केवळ पटेल, पारेख आणि मोदी-शाहांच्या मर्जीतील लोकांचा झाला आहे, असा खळबळजनक आरोप त्यांनी केला. जे आमदार या ‘गुलामी’चा आनंद साजरा करत आहेत, त्यांनी स्वतःला मराठी म्हणवून घेऊ नये, अशा बोचऱ्या शब्दांत त्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना सुनावले.

“अजितदादा पुन्हा मूळ प्रवाहात येणार होते!”

यावेळी राऊतांनी सर्वात मोठा राजकीय बॉम्ब टाकला तो म्हणजे अजितदादांच्या ‘घरवापसी’चा. अजित पवार भाजपच्या विचारधारेत कधीच रमले नव्हते, असा दावा करत राऊत म्हणाले की, “दादांनी केवळ आपल्यावरचे आरोप धुवून काढण्यासाठी सत्ता स्वीकारली होती. मात्र, ते पुन्हा एकदा शरद पवारांच्या मूळ विचारधारेत आणि स्वगृही परतण्यासाठी धडपडत होते. यासंदर्भात आमच्याशी आणि शरद पवार गटाशी त्यांची बोलणी सुरू होती.” या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य करताना राऊत म्हणाले की, फडणवीसांचा पक्ष अखंड महाराष्ट्राच्या विरोधात आहे आणि हे अजितदादांना चांगलेच ठाऊक होते. त्यामुळेच दादांचा फडणवीसांवर कधीच पूर्ण विश्वास नव्हता. आता अजितदादांनंतर हा पक्ष 100 टक्के दिल्लीचा गुलाम झाला असून, महाराष्ट्राची अस्मिता पायदळी तुडवण्याचे काम सुरू असल्याची टीका त्यांनी केली. राऊतांच्या या आक्रमक भूमिकेनंतर आता महायुतीतील नेते काय प्रत्युत्तर देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0