मुंबई

Maharashtra Vidhan Sabha Election: केंद्रीय निवडणूक आयोगाची दुपारी साडेतीन वाजता पत्रकार परिषद, निवडणुकांच्या तारखा जाहीर होणार!

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Election Commission Press Conference : महाराष्ट्रात एका टप्प्यात तर झारखंडमध्ये पाच टप्प्यात मतदान होण्याची शक्यता

मुंबई :– केंद्रीय निवडणूक आयोग Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Election Commission Press Conference आज दुपारी साडेतीन वाजता पत्रकार परिषद घेणार आहे. या पत्रकार परिषदेत महाराष्ट्र आणि झारखंड राज्याच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच, राज्यात आज दुपारपासूनच आचारसंहिता लागण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. महाराष्ट्रात एकाच टप्प्यात तर झारखंडमध्ये पाच टप्प्यात निवडणुका होण्याच्या शक्यता वर्तवल्या आहे.

महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ 23 नोव्हेंबर 2024 रोजी संपणार आहे. तर झारखंड राज्याचा विधानसभेचा कार्यकाळ 5 जानेवारी 2025 मध्ये संपणार होणार आहे. मागील दोन विधानसभाच्या निवडणुकीप्रमाणे यंदाही महाराष्ट्रात एकाच टप्प्यात निवडणुका होण्याची शक्यता वर्तवली आहे. झारखंडमध्ये पाच टप्प्यात मतदान झाले. महाराष्ट्र मध्ये 2014 आणि 19 मध्ये एकाच टप्प्यात निवडणुका झाल्या आहेत तर 2014 मध्ये 15 ऑक्टोंबर रोजी सर्व 288 जागांसाठी मतदान झाले होते. 2019 मध्ये 30 नोव्हेंबर एका टप्प्यात मतदान झाले होते.तर झारखंडमध्ये गेल्या दोन विधानसभा निवडणुकांमध्ये प्रत्येकी पाच टप्प्यांत मतदान झाले आहे. 2014 मध्ये 25 नोव्हेंबर, 2 डिसेंबर, 9 डिसेंबर, 14 डिसेंबर आणि 20 डिसेंबर रोजी मतदान झाले. तर 2019 मध्ये 30 नोव्हेंबर, 7 डिसेंबर, 12 डिसेंबर, 16 डिसेंबर आणि 20 डिसेंबर रोजी मतदान झाले.

2024 च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील 48 जागांपैकी भारत आघाडीला 30 तर एनडीएला 17 जागा मिळाल्या. यामध्ये भाजपला 9, शिवसेनेला 7 आणि राष्ट्रवादीला केवळ 1 जागा मिळाली. भाजपने 23 जागा गमावल्या. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत एनडीएला 41 जागा मिळाल्या होत्या. 2014 मध्ये हा आकडा 42 होता. म्हणजे निम्म्याहून कमी.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0