भारत 'रतन' टाटा कालवश 

भारत 'रतन' टाटा कालवश 

भारतातील (India) प्रसिद्ध उद्योगपती रतन नवल टाटा (वय ८६) (Ratan Tata) यांचे काल (ता. ९) मध्यरात्री अल्पशा आजाराने निधन झाले. 

१९९० ते २०१२ या कालावधीत टाटा उद्योग समूहाचे (Tata Group) अध्यक्ष होते. तर २०१६ ते २०१७ या कालावधीत ते टाटा समूहाचे अंतरिम अध्यक्ष होते. 

भारत सरकारने पद्मभूषण (२०००) आणि पद्म विभूषण (२००८) या पुरस्कारांनी रतन टाटांचा गौरव केला. 

रतन टाटा यांचा जन्म नवल टाटा आणि सुनी टाटा यांच्या घरी झाला होता.