मुंबई

Ashish Shelar On Sanjay Raut : संजय राऊत यांनी महाराष्ट्राबाहेर प्रकल्प हलवल्याची टीका, भाजप नेते आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिले

शिवसेनेचे (ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी सुरू असलेल्या प्रकल्पांवरून महायुती सरकारला धारेवर धरले होते. आता भाजप नेते आशिष शेलार यांनी संजय राऊत यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले आहे.

मुंबई :- उद्योग महाराष्ट्राबाहेर जात असल्याच्या आरोपावरून शिवसेना (ठाकरे) नेते संजय राऊत यांच्यावर टीका करताना मुंबई भाजपचे प्रमुख आशिष शेलार यांनी सोमवारी सांगितले की, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील पक्षाशी संलग्न असलेल्या कामगार संघटना राज्यातील औद्योगिक घटकांना त्रास देत आहेत.

शिवसेना (ठाकरे), राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) आणि काँग्रेसचा समावेश असलेल्या महाविकास आघाडीच्या नेत्याने एकनाथ शिंदे सरकारवर सातत्याने टीका केली आहे की ते इतर राज्यांमध्ये, विशेषत: शेजारील गुजरातमध्ये जाणारे प्रकल्प आणि गुंतवणूक रोखू शकले नाहीत .

आशिष शेलार यांनी संजय राऊत यांना घेरले

“एक्स”आशिष शेलार म्हणाले की,
श्रीमान मोरारजी राऊत !

महाराष्ट्रात एखादा उद्योग व्यवसाय येणार किंवा नविन विकास प्रकल्प होणार असे कळताच कट कमिशन आणि राजकीय स्वार्थासाठी हातात विरोधाचा झेंडा घेऊन जे उतारतात, उद्योगांना महाराष्ट्रातून पळवून लावतात, त्याच पक्षाचे नेते संजय राऊत महाराष्ट्रातून उद्योग गेले म्हणून “हग्रलेख” लिहितात?

आता विषय काढलाच आहे तर मग, संजय राऊत तुम्हाला उत्तर द्यावी लागतील… मुंबई सोडून एलएनटी का गेली? कुणाची युनियन होती? महेंद्रा कंपनी मुंबई सोडून अन्य राज्यात का गेली? कुणाची युनियन होती? खंबाटा, एएफएल लॉजिस्टीक यांनी का शटर डाऊन केली? या सगळयांना युनियन बनवून कुणी त्रास दिला? ही मुंबईतील काही मोजकी उदाहरणे महाराष्ट्रातील गेल्या 15 वर्षातील उद्योग बंद झाले त्याचा हिशेब काढला तर मग पुण्याच्या बजाज पासून सगळया कारखान्यांमध्ये उबाठाचीच युनियन होती ना?

वेदांत फॉस्कॉन, बारसूची ग्रीन रिफायनरी, वाढवण बंदर या प्रकल्पांना विरोध कोण करतेय ? आणि पुन्हा महाराष्ट्रातून प्रकल्प गेले म्हणून ओडताय ? चोर तर चोर वरुन शिरजोर ?

मराठी कामगारांना उध्दस्त करणाऱ्या उबाठाचे हात मराठी माणसाच्या रक्ताने ही माखलेले आहेत. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात मराठी माणासावर गोळया झाडणाऱ्या स. का. पाटील, मोरारजी देसाई यांच्या काँग्रेसच्या मांडीवर तुम्ही बागडत आहात ना?काँग्रेसशी हात मिळवणी केलीत, तुमच्या हाताला मराठी माणसाचे रक्त लागलेले आहे. तुम्हाला इतिहास कधीच माफ करणार नाही.

श्रीमान संजय राऊत तुमचे कसे झालेय सांगू का ?दुदैवाने ज्याला वेड लागते म्हणजे तुमच्या सारखा जो मनोरुग्ण असतो त्याला ना “आपण सोडून सगळं जग वेडं वाटत असतं”म्हणून तुम्ही मोरारजी राऊत आहात !

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0